पणजी: निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. गोवेकरांनी लोकशाहीच्या या उत्सवात मोठा उत्साह दाखवला. त्यामुळेच ७८.९४ टक्के इतके विक्रमी मतदान नोंदवले गेले आहे. यात सर्वाधिक मतदान साखळी मतदारसंघात झाले. या मतदारसंघातून हे भाजपकडून लढत आहेत. दरम्यान, गोव्यातील बंपर मतदान नेमके कोणाच्या बाजून झाले यावरून आता अनेक तर्क लावले जाऊ लागले असून मुख्यमंत्री सावंत यांनी मात्र विजयाचा दावा केला आहे. ( ) वाचा : गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी आज मतदान झाले. किरकोळ घटना वगळता राज्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यासोबतच मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते ( ), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव ( तृणमूल काँग्रेस ) रवी नाईक ( भाजप ), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र यांचे भवितव्य आज मतदानयंत्रात बंद झाले आहे. वाचा : मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाबाबत माहिती दिली. राज्यात ७८.९४ टक्के इतके मतदान झाले असून सर्वाधिक ८९.६४ टक्के इतके मतदान उत्तर गोव्यातील साखळी मतदारसंघात झाले आहे. उत्तर गोव्यात ७९ टक्के तर दक्षिण गोव्यात ७८ टक्के मतदान झाले असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात ८२.५६ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळी कमी मतदान झाले असले तरी करोना स्थिती लक्षात घेता अपेक्षेपेक्षा चांगले मतदान झाल्याचे सर्वांचेच म्हणणे आहे. प्रमोद सावंत यांना विजयाचा विश्वास गोव्यात निश्चितपणे पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार असून २२पेक्षा जास्त जागा जिंकून आम्ही स्पष्ट बहुमत मिळवू आणि कोणाच्याही मदतीशिवाय सरकार स्थापन करू, असा विश्वास मतदानानंतर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. उत्पल पर्रिकर आणि काँग्रेस नेते मायकल लोबो हे दोघेही जिंकणार नाहीत, असा दावादेखील सावंत यांनी केला. उत्पल हे भाजपमधून बंडखोरी करून पणजीत अपक्ष लढले आहेत. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/O0rQaIc
via IFTTT
