डेहराडून: उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तोफा धडाडू लागल्या असतानाच आसामचे मुख्यमंत्री व नेते यांनी काँग्रेस नेते व खासदार यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केले असून यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाकयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. ( ) वाचा : हिमंता बिस्वा सरमा हे उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदौऱ्यावर आहेत. त्यांनी आज एका प्रचारसभेत सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. २०१६ मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून केला होता. त्यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्यावर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्याकडे लक्ष वेधत हिमंता बिस्वा सरमा यांनी वादग्रस्त विधान केले. ' यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. मग राहुल गांधी यांनी त्याचा पुरावा मागितला. असं ते का वागतात कळत नाही. लष्कराच्या कारवाईचेही तुम्हाला पुरावे कशासाठी लागतात? पाकिस्तानात घुसून आम्ही बॉम्बस्फोट घडवले असे लष्कर म्हणत असेल तर त्यांनी ते फोडलेच असे म्हणावे लागेल. त्यावर शंका घेऊन करून वाद निर्माण करण्याचे कोणतेही कारण नाही. तो वादाचा मुद्दाच होऊ शकत नाही', असे नमूद करत सरमा यांनी राहुल यांच्यावर वैयक्तिक टीका केली. 'राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?', असा सवाल मुख्यमंत्री सरमा यांनी केला. वाचा: देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख दिवंगत बिपीन रावत हे सेवेत अशताना त्यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेचाही सरमा यांनी समाचार घेतला. जनरल रावत यांना काँग्रेसचे नेते 'सडक का गुंडा' म्हणाले होते आणि आता तेच लोक त्यांच्या नावाने उत्तराखंडमध्ये मते मागत आहेत. किती हा ढोंगीपणा?, असा सवाल सरमा यांनी केला. कर्नाटकातील हिजाब वादावरही ते बोलले. शिक्षण सोडून हिजाबचा वाद उगाचच निर्माण करण्यात आला आहे. यामागे काँग्रेसचं राजकारण आहे. हे सगळं व्होटबँकेसाठी चाललं असून काँग्रेसला एकदा नाही पुन्हा पुन्हा हरवलं पाहिजे, असे सरमा म्हणाले. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hF6zMti
via IFTTT
