सिंधुदुर्ग: ' यांची भूमिका प्रत्येक पक्षामध्ये गेल्यानंतर बदलत असते. नितेश राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा जैतापूर आणि नाणार रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. जेव्हा राणेंनी स्वतःचा पक्ष काढला तेव्हा या दोन्ही प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका घेतली. स्वतःच्या पक्षात असताना त्या प्रकल्पासंदर्भात आंदोलन केली, अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते भाजपमध्ये गेले तेव्हा भाजपप्रमाणे भूमिका मांडू लागले', अशा शब्दात टीका करत शिवसेनेचे यांनी आमदार नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांचा शिवसेनेवर बोलण्याचा अधिकार नाही, तो हक्क त्यांनी केव्हाच गमावलेला आहे, अशी बोचरी टीकाही आमदार नाईक यांनी केली आहे. ( mla vaibhav naik gives reply to mla who criticized minister aaditya thackeray) कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरीला स्थानिक लोकांचा विरोध होता आणि त्या विरोधाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. काल आदित्य ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी राजापूर मध्ये अनेक शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेऊन नाणार रिफायनरी संदर्भात निवेदन देऊन रिफायनरी झाली पाहिजे अशी मागणी केली. कोकणात येणाऱ्या या प्रकल्पाला पाठिंबा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, असे नाईक म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- आमदार नाईक पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात होणाऱ्या ग्रीन रिफायनरी संदर्भात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पुढच्या काळात त्यासंदर्भात निर्णय घेतील. जैतापूर प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्यानेच शिवसेनेचा विरोध होता. त्याचप्रमाणे नाणार रिफायनरीला राजापूर, देवगडमध्ये स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होता, त्यामुळेच शिवसेनेने लोकमताचा आदर करत विरोध दर्शवला होता. शिवसेनेची पहिल्यापासून एकच भूमिका आहे, स्थानिक लोकांच्या मताला पाठिंबा देत असते. या पुढच्या काळात सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली भूमिका त्या पद्धतीने ठरवतील. क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पंतप्रधानांना अनेक निवेदने देत असतात. त्यातीलच एक निवेदन हे रिफायनरी संदर्भातला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. मात्र, शिवसेनेची भूमिका कायम लोकांसोबत आहे. मात्र नितेश राणे यांची भूमिका ही सत्तेतील लाचार लोकप्रतिनिधीप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे ते पक्ष बदलतात त्याप्रमाणे ते आपली भूमिका बदलत असतात. मात्र शिवसेनेची भूमिका लोकांच्या सोबत असते. येणाऱ्या काळात दोन्ही बाजूंनी रिफायनरी संदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील आणि तो निर्णय कोकणातील जनतेला मान्य असेल, असे नाईक म्हणाले. आमदार नितेश राणे यांनी आपले वडील केंद्रीय मंत्री झाल्यानंतर कोकणासाठी काय केले यासंदर्भात चर्चा केली पाहिजे. रिफायनरीसंदर्भात राज्य सरकारची जी भूमिका आहे, ती भूमिका राज्य सरकार योग्य पद्धतीने पार पाडणार. राज्य सरकारकडे जे अधिकार आहेत ते अधिकार वापरून रिफायनरीसाठी योग्य जागा राज्य सरकार देईल, असे ते पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे देवगडमध्ये गेले असता त्यांनी सिंधुदुर्गात शिवसेनेचा आवाज वाढल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना नितेश राणे यांनी हा आवाज मांजरीचा की वाघाचा वाढला अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार वैभव नाईक यांनी कोणता आवाज थांबवल्यानंतर ते दुसऱ्या पक्षात धाव घेतात, ते आपण बघितले असाल. आवाज आणि कारवाई यांच्या नादात त्यांनी तीन ते चार पक्ष बदलले. एकदा कारवाई केली की यांची भागमभाग होते हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या आरोपाला किंवा म्हणण्याला काही अर्थ राहिलेला नाही, असे प्रत्युत्तर आमदार नाईक यांनी दिले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oC0NekF
via IFTTT
