म. टा. प्रतिनिधी लोणावळा बारावीचा पेपर देऊन मावळातील परिसरात फिरायला गेलेल्या दोन १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कासारसाई धरण परिसरात घडली. ( in area in ) य आरिष घोगी (वय- १७, रा. निगडी प्राधिकरण) व विनय किसन कडू (वय- १७, रा. निगडी, मुळ येळसे, मावळ) असे धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावी वर्गात वेगवेगळया कॉलेजध्ये शिकणारे सहा मित्र बारावीच्या परिक्षेचा पेपर देऊन कासारसाई धरण परिसरात फिरायला गेले होते. हे मित्र पाण्यामध्ये उतरले असता त्यापैकी विनय आणि आरिष यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात पोलीस, स्थानिक नागरिक व वन्यजीव रक्षक टिमला यश आले असून, मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. क्लिक करा आणि वाचा- शिरगाव पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल समाधान फडतरे, स्थानिक नागरिक राजाराम केदारी यांच्यासह वन्यजीव रक्षक टिम मावळचे निलेश गराडे, शुभम काकडे, गणेश मिसाळ, अंकुश नागरगोजे, आकाश पवार, संतोष गोपाळे, सुरज शिंदे यांनी दोन तास अथक प्रयत्न करुन मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेचा पुढील तपास शिरगाव परदंवडी पोलीस करत आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/NHpdJ7g
via IFTTT
