मुंबई: मुंबई पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा दावा करत खासदार यांनी थेट यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याबाबत २४ तासांत अहवाल देण्यात यावा, असे लोकसभा सचिवालयाकडून राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. ( ) वाचा : यांच्या घरासमोर पठण करणारच, असा निर्धार करून नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे मुंबईत दाखल झाले असता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. २३ एप्रिल रोजी त्यांना खार पोलिसांनी अटक केली. त्याच रात्री पोलीस स्टेशनमध्ये मला अपमानास्पद वागणूक दिली गेली, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. याबाबत त्यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. राणा यांनी लोकसभाध्यक्षांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये ९ मुद्दे नमूद केले आहेत. त्यात स्टेशनमधील घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. मी मागासवर्गीय असल्यानेच मला ड्युटीवरील पोलिसांनी जातीवरून हिणवले. तिथे रात्रभर मला पिण्यासाठी पाणी दिले गेले नाही. पोलीस स्टेशनमधील बाथरूम वापरू दिले नाही, असा दावा राणा यांनी केला आहे. वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही पत्रात आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून मुंबई पोलिसांनी कोणतीही नोटीस न देता आमच्या घरात घुसून मला आणि माझ्या पतीला बेकायदा अटक केली. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, याचे भानही पोलिसांनी बाळगले नाही, असे राणा यांनी पत्रात नमूद केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्यामागे आमचा हेतु प्रामाणिक होता. आम्ही त्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रित केलं होतं. शिवसेनेला हिंदुत्वाचे स्मरण करून देण्यासाठी आम्ही तिथे जाणार होतो. पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे लक्षात घेऊन आम्ही तेथील हनुमान चालीसा पठण रद्द केले. मात्र, त्यानंतरही चुकीच्या पद्धतीने आमच्यावर कारवाई करण्यात आली, असे नवनीत राणा यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे. राणा यांच्या पत्राची लोकसभाध्यक्षांनी तातडीने दखल घेतली असून याबाबत २४ तासांत अहवाल द्यावा, असे लोकसभा सचिवालयाकडून महाराष्ट्र सरकारला सांगण्यात आले आहे. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KJsRvCn
via IFTTT
